वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळाचे अध्यक्ष सुभाषराव ठाकरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रध्वजास मानवंदना माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत,व राज्यगीत ने वातावरण देशभक्तिमय झाले. स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, भारतीय संविधानाचे महत्त्व तसेच देशाच्या प्रगतीमध्ये युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुभाषराव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचा विकास, मंगरूळपीर येथे सर्व सामान्य नागरिकांची शिक्षणासाठी परवड होऊ नये म्हणून शिक्षण प्रसारासाठी संस्था स्थापन केली आहे.यातून हजारो लोकांना रोजगार व विकास करण्याची संधी मिळाली हेच मला अभिप्रेत आहे असे सांगितले.तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी आपल्या मनोगतामधून संगणक, ए. आय तंत्रज्ञानात भर घालून विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देण्याची आपली इच्छा जाहीर केली.यावेळी मंचकावर रमेश नावंदर,नारायणराव बारड,राजकुमार गावंडे,राजू पाटील,प्रकाश महल्ले,डॉ.नवल असावा,चंद्रकांत पाकधने, किशोर पाटील कदम, लईक अहमद, नरेश भगत, अमोल पाटील, यशवंत धोटे, गिरीश बाहेती, विजय भोजने,संकुलातील सर्व शाळा,महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली. कु. नेहा जटाळे आणि वेदांत गोदुवाले वाय. सी. सी. बी. एस. सी. स्कूल. कु. उन्नती जाधव आणि कु. आराध्य चव्हाण वाय सी इंग्लिश हायस्कूल यांनी देशभक्तिपर गीत, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित केले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वारसा पुढे नेत राष्ट्राच्या विकासात प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांचे प्राताविक प्राचार्य डॉ.राहुल सुर्वे यांनी केले.तर सूत्र संचालन प्रा. डॉ. अनंत शिंदे,प्रा.डॉ.श्रीकांत रासेकर यांनी केले. उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सांगता झाली.





