देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मुक्तिसंग्राम हा मानवमुक्तीचा लढा : प्रा.हनुमान व्हरगुळे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2025
in परभणी
0
मुक्तिसंग्राम हा मानवमुक्तीचा लढा : प्रा.हनुमान व्हरगुळे
Please Share

सेलूतील ‘एक दिवस, एक पुस्तक’ उपक्रमाचे ३२ वे पुष्प

सेलू : “मराठवाडा मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठीचा नसून, तो खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा लढा होता. निजामशाहीच्या जुलमी राजवटीविरुद्ध मराठवाड्यातील जनतेने प्राणांची बाजी लावून संघर्ष केला,” असे प्रतिपादन नूतन महाविद्यालयाचे प्रा. हनुमान व्हरगुळे यांनी केले. ते ‘एक दिवस – एक पुस्तक’ या उपक्रमातील चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेचे सहशिक्षक डॉ. बाबासाहेब थोरे होते.स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालय, सेलू यांच्या वतीने ‘एक दिवस – एक पुस्तक’ हा मासिक उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमातील ३२ वे पुष्प कौस्तुभ दिवेगावकर यांच्या “मराठवाडा १९४८ मुक्तिसंग्रामाचा समकालीन शोध” या ग्रंथावर चर्चा आयोजित करून गुंफण्यात आले. हरिती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथात मराठवाडा मुक्ती संग्रामातील विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला आहे.

आपल्या भाषणात प्रा. व्हरगुळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, तसेच स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, विनायकराव चारठाणकर आणि विठ्ठलराव शिंदे यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे महत्त्वपूर्ण योगदान सांगितले. त्यांनी रझाकारांच्या दहशतीला तोंड देत झालेला सशस्त्र आणि नि:शस्त्र संघर्ष, ग्रामीण जनतेचा सहभाग, तसेच शेतकरी व कामगारांनी दिलेल्या योगदानाचाही सखोल आढावा घेतला. या चर्चेतून तरुण पिढीला स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रेरणादायी दर्शन घडले.या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली. संतोष बोरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर बाळू बुधवंत यांनी आभार मानले. या वेळी रघुनाथ देशमुख, संपतराव झोडगावकर, के.जी.कुलकर्णी, रमा बाहेती, जयंत नाईक, जी.ए. गुंजकर, सिद्धार्थ वाघमारे, मोहन पाटील, पूनमचंद खौना, गौतम सूर्यवंशी, विठ्ठल साबळे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,200
Please Share
Previous Post

शाळा बहिष्कार आंदोलन मागे

Next Post

मुक्तिसंग्राम लढ्यात परभणीचे मोठे योगदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मुक्तिसंग्राम लढ्यात परभणीचे मोठे योगदान

मुक्तिसंग्राम लढ्यात परभणीचे मोठे योगदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ