देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शाळा बहिष्कार आंदोलन मागे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2025
in परभणी
0
शाळा बहिष्कार आंदोलन मागे
Please Share

गोहेगाव ग्रामस्थांशी शिक्षणाधिकारी पोलास यांनी केली चर्चा, दोन शिक्षकांची प्रतिनियुक्ती

सेलू : दोन शिक्षकांच्या बदलीमुळे सेलू तालुक्यातील गोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पालक आणि ग्रामस्थांनी ९ सप्टेंबरपासून सुरू केलेले शाळा बहिष्कार आंदोलन सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी मागे घेतले आहे. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील पोलास यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून याप्रश्नी समाधानकारक मार्ग काढला.
शिक्षण विभागाने तत्काळ दोन शिक्षकांची प्रतिनियुक्ती केली आहे. त्यामुळे बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आले. शाळेतील जुने शिक्षक जे.ए.धामणगावे आणि जी.आर. बोरगावकर यांची बदली झाल्यामुळे आणि त्यांच्या जागी एस.ए. दिवटे आणि डी.एस.भांडे यांची नियुक्ती झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. नवीन दोन्ही शिक्षकांच्या नियुक्तीला ग्रामस्थांनी २० ऑगस्ट रोजीच आक्षेप घेतला होता. उत्कृष्ट शिक्षक द्या अशी मागणी करीत मुले शाळेत पाठविणार नसल्याची भूमिका घेऊन गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात साखळी उपोषण सुरू केले होते. तसेच सेलू तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. ९ सप्टेंबरपासून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. या प्रकरणाची दखल घेत सोमवारी शिक्षणाधिकारी सुनील पोलास, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण आणि केंद्रप्रमुख नूर शेख यांनी गोहेगाव येथे भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी रामेश्वर गटकळ तसेच शालेय समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या चर्चेनंतर प्रशासनाने तत्काळ ज्ञानेश्वर पौळ आणि मधुकर कटारे या दोन शिक्षकांची प्रतिनियुक्ती केली. तसेच, बदली होऊन आलेले दिवटे आणि भांडे यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले, अशी माहिती सरपंच स्वाती रामेश्वर गटकळ आणि मुख्याध्यापक पंकज चव्हाण यांनी दिली.

Post Views: 1,259
Please Share
Previous Post

दुधनाकाठच्या पिकांचे मोठे नुकसान

Next Post

मुक्तिसंग्राम हा मानवमुक्तीचा लढा : प्रा.हनुमान व्हरगुळे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मुक्तिसंग्राम हा मानवमुक्तीचा लढा : प्रा.हनुमान व्हरगुळे

मुक्तिसंग्राम हा मानवमुक्तीचा लढा : प्रा.हनुमान व्हरगुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ