संयुक्त किसान मोर्चाचे सेलू तहसीलदार यांना निवेदन
सेलू : जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २०२५ या तिनही महिन्यात सातत्य पूर्ण पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन, कापुस, तुर, मुग, उडीद इत्यादी खरीप पिकांची पुरती वाट लागली आहे. नदी, नाले, ओढ्याकाठची करोडो टन माती व पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे संपूर्ण सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनावर रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, दत्तुसिंग ठाकूर, संतोष पौळ आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.





