सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात इयत्ता ५वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
सेलूतील विवेकानंद विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे, गजानन साळवे, अनिल कौसडीकर, आश्विनी पावसे, शंकर राऊत आणि रुपाली सपकाळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.याप्रसंगी मार्गदर्शन करताना मिलिंद सावंत म्हणाले की, स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंदाचा क्षण असून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे ते एक हक्काचे व्यासपीठ आहे. मनोरंजन आणि उत्साहाचा हा एक सुंदर मिलाप असतो. कलागुणांच्या सादरीकरणासोबतच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सक्षमपणे सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत, आम्ही शिवकन्या, काठी न घोंगड, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि सरस्वती वंदना अशा विविध गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी व मोहिनी लोणीकर यांनी केले. हे कलाविष्कार पाहण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती.





