देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतीचे भविष्य मिश्र फळबागेतच

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 30, 2025
in परभणी, मराठवाडा
0
शेतीचे भविष्य मिश्र फळबागेतच
Please Share

मिशन प्राणाचे प्रमुख ध्रुव साकोरे यांचे मत, बोर्डीकर महाविद्यालयात कार्यक्रम

सेलू : पारंपरिक कापूस-सोयाबीन शेतीत मेहनत जास्त असूनही नफा कमी असल्याने तरुण वर्ग शेतीकडे पाठ फिरवत आहे. अशा परिस्थितीत मिशन प्राणा ग्लोबर्क सोल्युशन आणि अ‍ॅग्रो रेंजर्स यांच्या माध्यमातून मिश्र फळबाग हा शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम पर्याय असल्याचे मत मिशन प्राणाचे प्रमुख ध्रुव साकोरे यांनी व्यक्त केले आहे.

शुक्रवारी, २९ ऑगस्टरोजी सेलू येथील तालुका कृषी विभाग, मिशन प्राणा आणि बोर्डीकर कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या काळ्या सुपीक जमिनीला आणि जीवनदायिनी गोदावरी, दुधना, करपरा, पूर्णा नद्यांच्या पाण्याला जगभर मान्यता असतानाही शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी का राहते? असा प्रश्न उपस्थित करत मिशन प्राणा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच एक नवी दिशा दाखवेल, असा विश्वास श्री.साकोरे यांनी व्यक्त केला.

श्री साकोरे म्हणाले, “आजच्या शेतकऱ्याचा संघर्ष उद्याच्या पिढीचे भविष्य घडवेल. मिश्र फळबाग ही केवळ शेतीतील एक नवी क्रांती नसून, ग्रामीण भारताच्या समृद्धीचे बीज आहे.” प्रत्येक शेतात आंबा, पेरू, मोसंबी, चिकू अशा ४-५ प्रकारच्या फळझाडांची लागवड केल्यास एका पिकावर अवलंबून राहावे लागणार नाही. नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल.मिश्र फळबागेमुळे कार्बन शोषण होऊन वैज्ञानिक प्रमाणपत्र मिळेल, ज्यामुळे राष्ट्रीय बाजारपेठेत फळांना चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढेल. या उपक्रमातील सर्व खर्च सी.एस.आर. फंडिंग आणि शासकीय योजनांतून केला जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प खर्चात हा नवा मार्ग उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “जय जवान, जय किसान, जय विज्ञान” या घोषणेला प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य मिशन प्राणा करत असून, हा उपक्रम शेतीला नवा श्वास, तरुणांना नवी आशा आणि देशाला नवा मार्ग दाखवेल, असा विश्वास ध्रुव साकोरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला शेतकरी, कृषी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,272
Please Share
Previous Post

कापूस आयात शुल्कमाफी मुदतवाढीने शेतकऱ्यांवर अन्याय

Next Post

राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ