सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती
सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या वतीने ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता शुक्रवार, १९ जूनरोजी भक्तीमय वातावरणात झाली. यानिमित्ताने श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर ते साई मंदिरादरम्यान काढलेल्या भव्य ग्रंथदिंडीने आणि जागोजागी सादर सजीव देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले.
दिंडीची सुरुवात ग्रंथ व पालखी पूजनाने झाली. रथामध्ये कथा प्रवक्ते पद्मनाभ महाराज व्यास, संहिता वाचक गोविंदगुरू जोशी आसनस्थ होते. दिंडी मार्गावर भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, कीर्ती राऊत यांच्या संकल्पनेतून विठ्ठल-रूक्मीणी, श्रीकृष्ण-राधा, नृसिंह-हिरण्यकश्यपू यांच्या सजीव देखावे आकर्षण ठरले. स्नेहल जाधव, आरती कडवे, सिध्द आवटे, भाग्यश्री रत्नपारखी, अनया ढाकणे, स्वरा देशपांडे या विद्यार्थ्यांनी हे देखावे साकारले. पांडुरंग पाटणकर, डॉ.शरद ठाकर, माधव गव्हाणे, अनंत मोगल यांनी सुरेख रांगोळी काढली होती.
कथेच्या प्रारंभी सच्चिदानंद डाखोरे, इशिता अतुल कुलकर्णी यांनी भक्तीगीत गायले. शंतनू महाराज पाठक, शुभदा गोळेगावर यांनी मनोगत व्यक्त केले. आयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. सूत्रसंचालन प्रकाश कुरूंदकर, अनिल रत्नपारखी यांनी केले. महाप्रसादाने सांगता झाली. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सकारात्मक विचारातूनच जीवनात आनंद : कथा सांगताप्रसंगी पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की, आपण डोळ्यांनी जे पाहातो त्याचा मनावर अधिक प्रभाव पडतो, म्हणून चांगले तेच पाहिले पाहिजे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन त्याचे विचार कसे आहेत यावरून होते. आपला स्वभाव चांगला होण्यासाठी नेहमी चांगले चिंतन करावे. ज्ञान संपादन करून गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. सकारात्मक विचारच सुखी, आनंदी जीवनाचे शिल्पकार असतात.
परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...
आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...