दीपस्तंभ, आर्यवैश्य समाज आणि महिला मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम
सेलू : पर्यावरणाचे संतुलन राहावे आणि पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी दीपस्तंभ प्रतिष्ठान, आर्यवैश्य समाज आणि सेलू महिला मंडळाच्या वतीने शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
आर्यवैश्य समाज भूषण तसेच निसर्गप्रेमी आणि वनरक्षक नामदार सुधीर मुनगंटीवार (माजी अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या ३० जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आर्यवैश्य समाज, दीपस्तंभ प्रतिष्ठान व महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण हा सामाजिक आणि सामुदायिक उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे महत्त्वाचे आहे, हेच विचार घेऊन शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात हा सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाला दीपस्तंभ प्रतिष्ठानचे माधवअण्णा लोकूलवार, विवेकानंद विद्यालयाचे स्थानिक अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेल्लुरकर, करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे, भाजपचे शहराध्यक्ष अशोक शेलार, मनीष कदम, संध्या चिटणीस, रुपाली ठाकूर, महिला मंडळाच्या ललिता गिल्डा, मंजुषा सेलगावकर, यशोदा कुंदनानी, बालाजी मोटरवार, राजश्री लोकूलवार, मोहन व मंजुषा कोत्तावार, विकास व सुचिता गादेवार, नागनाथ व सविता कलकोटे, बालाजी व रजनी काचेवार, अनिल बंडेवार, संजय व सुजाता कोटलवार, गजानन फुटाणे, ज्ञानेश्वर फुटाणे, राजश्री फुटाणे, कैलास व अश्विनी मरेवार, कल्पना डाचेवार, गौशेटवार, शशिकांत मालशेटवार, प्रवीण कोत्तावार, प्रसाद काचेवार यांची उपस्थिती होती.





