देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

टीईटीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 1, 2025
in महाराष्ट्र
0
टीईटीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार
Please Share

शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही, शिक्षक संघटनांचा ४ ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित

नागपूर, दि. १ ऑक्टोबर : माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार, इयत्ता १ ली ते ८ वी ला अध्यापन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका (Review Petition) दाखल करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाचे आयोजन केले होते.या गंभीर विषयाची तत्काळ दखल घेऊन, यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी रवी भवन, नागपूर येथे राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. या बैठकीत राज्याचे शालेय शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह आणि शिक्षण संचालक शरद गोसावी दृकश्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून सहभागी झाले होते.या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांच्यासह सर्व उपस्थित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची आग्रही मागणी केली.शिक्षक संघटनांची ही मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर साहेब मान्य केली. त्यांनी महाराष्ट्र शासन टीईटी निर्णयासंबंधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची ग्वाही दिली. या आश्वासनानंतर, शिक्षण राज्यमंत्र्यांनी शिक्षक संघटनांना ४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत शिक्षक संघटनांनी महाराष्ट्र शासन आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे त्वरित कार्यवाही केल्याबद्दल आभार मानले आहेत आणि मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी दिली आहे.

Post Views: 1,202
Please Share
Previous Post

इंद्रायणी देवी यात्रेत हजारोंनी घेतला महाप्रसाद

Next Post

सेलूत कुंकुमार्चन पूजन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत कुंकुमार्चन पूजन उत्साहात

सेलूत कुंकुमार्चन पूजन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ