महाभारत संदेश कथा : स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन

सेलू : प्रत्येकाच्या मनात आनंदाचा झरा वाहतो. हा आनंदाचा झरा वाहता ठेवा.अहंकारी माणसं कुणालाही आवडत नाहीत. विनम्रता आणि गुणवत्ता दुसऱ्यांच्या हृदयात जागा निर्माण करते. म्हणून मी पणा सोडा; विनम्र वागायला शिका, असे प्रतिपादन स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी केले.
सेलू शहरातील अलंकापुरी नगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात तिसऱ्या दिवशी शनिवारी, १४ मार्च २०२६ रोजी ‘महाभारत संदेश कथा’ गुंफताना स्वामीजी बोलत होते.याप्रसंगी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, मुकेश हरिभाऊ बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे आणि बिहाणी परिवारातर्फे स्वामीजींचे पूजन करण्यात आले. स्वामीजी म्हणाले, की खरी कीर्ती कोणीही पुसून काढू शकत नाही. आपले कर्तृत्व असे सिद्ध करा माणसं स्वतः हून आपल्या पाठिशी उभे राहावेत. सामुहिक पुरूषार्थाने मोठमोठे कार्य सिद्धीस जातात. हा संदेश महाभारत कथेतून मिळतो.





