जवानांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित : कॅप्टन रमेश काकडे
सेलू : शहरातील क्रांती चौक मशालीजवळ रविवारी, २६ जुलै रोजी माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहिद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
माजी सैनिक संघटनेच्या वतीने मशाल पेटवून व बंदुकीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून “भारत माता की जय, वीर जवान अमर है, जयघोष करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरुण नागरे, कॅप्टन के.पी शर्मा, कॅप्टन रमेशराव काकडे, प्रशांतसिंह रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, विक्रांत पाटील यांच्या हस्ते मेणबत्ती पेटवून व मशालीची ज्योत पेटवून विर जवानांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक अरुण नागरे, कॅप्टन के.पी.शर्मा, कॅप्टन रमेश काकडे, लक्ष्मण शेरे, रामचंद्र कलालडे, विठ्ठलसिंह रघुवंशी, सुरेश रोडगे, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर कावळे, गोरख राऊत, विजय देशमाने, सतीश महाजन, सुरेश रोडगे, प्रशांत रघुवंशी, सुनील गायकवाड, सतीश जाधव, विक्रांत पाटील, पत्रकार महेश राऊत, रघुनाथ देशमुख, रवि मुळावेकर, देवेंद्र कुरा आदींसह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविकात कॅप्टन रमेश काकडे यांनी कारगिल विजय दिवसाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार सुनील गायकवाड यांनी मानले





