चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांची बाजी; गुणवंतांचे सर्वत्र कौतुक
सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चमकदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत कु. आयुषा विष्णू काळे हिने २३८ गुण मिळवून जिल्ह्यात १२ वा क्रमांक पटकवला. तसेच चि. अंकित अनुरुद्र आघाव याने २३२ गुण मिळवत जिल्ह्यात २२ वा क्रमांक, तर कु. राजलक्ष्मी नितीन कुंभकर्ण हिने १९२ गुण मिळवून जिल्ह्यात १०२ वा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती मिळवली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना रागिणी जकाते, काशिनाथ पांचाळ आणि चंद्रकांत कव्हळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि पालकांचे सहकार्य यांमुळे हे यश शक्य झाले आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, उपाध्यक्षा ज्योतीताई ठाकूर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे, संस्था प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे, स्थानिक समितीचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी आणि मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांनी कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





