चौथी व सातवीच्या ८ विद्यार्थ्यांनी पटकावली शिष्यवृत्ती; गुणवंतांचा गौरव
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ७ वी) व प्राथमिक (इयत्ता ४ थी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल विद्या विहार प्रशाला, अंबिकानगर, परभणीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेचे एकूण आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
इयत्ता चौथीमधून अदिती गजानन साखरे (२५४ गुण – जिल्ह्यात ४ थी), श्लोक निलेश तिवटणकर (२५२ गुण – जिल्ह्यात ७ वा), रुनल सुनिल आहेर (२२८ गुण – जिल्ह्यात २५ वी), श्रीया स्वप्नील कदम (२२४ गुण – जिल्ह्यात २९ वी), शेषराज अर्पण देवडे (२०४ गुण – जिल्ह्यात ६० वा) आणि रणविजय रत्नेश्वर भिसे (१९४ गुण – जिल्ह्यात ९१ वा) या सहा विद्यार्थ्यांनी बाजी मारली.तसेच इयत्ता सातवीमधून अनन्या महेश कुऱ्हे (२३८ गुण – जिल्ह्यात २७ वी) आणि श्रेया स्वदेश कदम (२३६ गुण – जिल्ह्यात ३१ वी) या दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक झाल्या आहेत.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर व अनिता विवेक नावंदर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी मुख्याध्यापक नितीन गोराडकर, नागेश जोशी, प्राजक्ता कानडखेडकर, दत्ता देवकर, आनंद बदाले, सुलोचना ढगे आणि श्रद्धा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.या विद्यार्थ्यांना भाग्यश्री शेटे, स्वाती कुलकर्णी, मंजुषा देशपांडे, शेवाळे, आदित्य शिंदे आणि कुंदन वाघंबरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर, उपाध्यक्ष ॲड. विलास पोहंडूळकर, सहसचिव ॲड. संजय देशपांडे, कोषाध्यक्ष विनय नावंदर, ॲड. अशोक सोनी, पवनकुमार झांजरी व मल्हार विहीटकर यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.





