अनिलराव नखाते यांची सेलूतील स्नेहमेळाव्यात ग्वाही
सेलू : हादगाव बु. जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या शेतरस्त्यांची कामे पूर्ण करून ऊस वाहतुकीची समस्या मार्गी लावली आहे. यासह इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विविध विकासकामे प्रगतीपथावर असून, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर हे सर्कल विकासाचे आदर्श मॉडेल बनवणार असल्याची ग्वाही वाल्मिकी अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव नखाते यांनी दिली. पाथरी तालुक्यातील हादगाव बु. सर्कल मधील नोकरी, व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणासाठी सेलू येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सपत्नीक स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. सेलू येथील गुरुकृपा हॉटेलमध्ये हा मेळावा पार पडला.
यावेळी व्यासपीठावर आण्णासाहेब आमले, जालिंदर क्षिरसागर, गंगाधरराव ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, खेडुळाचे उपसरपंच दत्तराव वराडे, जगन्नाथ बापू हारकळ, सरपंच बिभीषण नखाते, रामप्रसाद डुकरे, पांडुरंग डुकरे, संदीपन हारकळ आणि डॉ. हनुमंत नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती. अनिलराव नखाते पुढे म्हणाले की, हादगाव बु. येथील विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवली असून सर्कलच्या सर्व गावांत शेतीरस्ते, पाणंद रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. आमदार राजेश विटेकर यांची या कामांना भक्कम साथ लाभली असून, या भागाचा भूमिपुत्र म्हणून विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्नेहमेळाव्याला संबोधित करताना दत्तराव वराडे यांनी सांगितले की, विकासपुरुष अनिलराव नखाते यांनी सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू केली आहेत. संदीपन हारकळ यांनी नखाते कुटुंबाच्या राजकीय आणि सामाजिक कौशल्याचा गौरव करत युवक नेतृत्व अजिंक्य नखाते यांच्या जनसेवेचा उल्लेख केला. भावनाताई नखाते यांनी यावेळी सांगितले की, नखाते कुटुंब राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली हादगाव बु. सर्कलचा चेहरामोहरा बदलण्याचा वसा आम्ही घेतला असून, या विकासासाठी नागरिकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग नखाते यांनी केले तर शुभम कणसे यांनी आभार मानले. या मेळाव्यास मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि पदाधिकारी उपस्थित हो





