पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण
परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते १० ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथा सोहळ्यास ४ ऑगस्ट रोजी उत्साहात प्रारंभ झाला.
सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी कथाव्यास पंडित निर्मलकुमार शुक्ला यांनी वाल्मीकि रामायणाचे सुंदर व रसाळ निरूपण केले. या श्रीराम कथेचे पूजन नंदलाल सोनी यांच्या हस्ते करण्यात आले, तर आचार्य निलेश तिवारी यांनी मंत्रोच्चार केले. पंडित शुक्ला हे दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत श्रीराम कथेचे निरूपण करणार आहेत.या प्रसंगी रामकिशन भूतडा, रामेश्वर अजमेरा, देवानंद लोंढे, योगेश राठोड, प्रा. प्रल्हादराव शिवपूजे, अरविंद कुलकर्णी, महेश सोनी आणि श्रीनिवास अजमेरा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पेडा हनुमान मानसप्रेमी मंडळ व मुख्य पुजारी श्रीराम तिवारी यांनी केले आहे.





