देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी चैतन्य
परभणी : स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी आयोजित तिरंगा सायकल रॅलीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीते गात आणि घोषणा देत रॅली उत्साहात पार पडली.
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून जिल्हा क्रीडा संकुलातून सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, विसावा कॉर्नर मार्गे शहरातील मुख्य रस्त्याने जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक वामन बेले, मुख्याध्यापक पी.आर. जाधव, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, क्रीडा अधिकारी रोहन औढेंकर, अब्दुल मुजीब खान, मोहम्मद लैखोदिन अन्सारी, मंगेश इंगळे, यमनाजी भारशंकर, कृष्णा शिंदे, जी. डी. आव्हाड यांची उपस्थिती होती.
रॅलीत गांधी विद्यालय, एकतानगर, भारतीय बाल विद्यामंदिर, डॉ. झाकीर हुसेन विद्यालय, खो-खो प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील धीरज नाईकवाडे, योगेश आदमे, भागवत दुधारे आणि प्रकाश पंडित यांनी परिश्रम घेतले.





