काही गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल
परभणी: आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वेने काही महत्त्वाच्या रेल्वे सेवांवर परिणाम झाल्याची माहिती दिली आहे. हैदराबाद विभागातील काही रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली असून, प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या स्थितीची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रद्द झालेल्या गाड्या
- २८ ऑगस्ट रोजी रद्द झालेल्या गाड्या:
- काचेगुडा – नागसरोल (१७६६१)
- काचेगुडा – नरखेड (१७६४१)
- नांदेड – मेडचल (७७६०६)
- २९ ऑगस्ट रोजी रद्द होणाऱ्या गाड्या:
- नागरसोल – काचेगुडा (१७६६२)
- नरखेड – काचेगुडा (१७६४२)
मार्गात बदल केलेल्या गाड्या
- साईनगर शिर्डी – तिरुपती (१७४१८): ही गाडी आता परभणी, परळी वैजनाथ, आणि विकाराबाद या मार्गाने धावेल.
- काचेगुडा – भगत की कोठी (१७६०५): या गाडीचा मार्ग बदलून ती काचेगुडा, मौला अली जी, काझीपेट, पेड्डपल्ली बायपास, करीमनगर, आणि निजामाबाद या मार्गाने जाईल.
अंशतः रद्द झालेल्या गाड्या
- निजामाबाद – तिरुपती रायलसीमा एक्सप्रेस (१२७९४): ही गाडी निजामाबाद ते सिकंदराबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
- नांदेड – विशाखापट्टणम (२०८१२): ही गाडी नांदेड ते चारलापल्ली दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
.





