नवी मुंबईतील इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
सेलू : शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे सतीश सदाशिव जाधव यांना इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या वतीने ‘समाजभूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. २० सप्टेंबररोजी नवी मुंबई येथील विश्वनाथ भावे नाट्यगृह, वाशी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी सतीश जाधव यांना शाल, हार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.या समारंभाला पालकमंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरदरावजी ढोले, धर्मजागरण प्रमुख कोकण प्रांताचे राजेशजी कुंटे आणि अखिल भारतीय मातंग संघाच्या अध्यक्षा कुसुम बाबासाहेब गोपले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, कल्याण साठे, संतोष जाधव, ॲड. राम चव्हाण, गुलाबराव साठे, अशोकराव शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.सतीश जाधव यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. के.डी. वाघमारे, लक्ष्मण केदासे, ल.मा. शेवाळकर, सुनील गायकवाड, अश्विन केदासे, राजेश ढवळे, शुकाचार्य शिंदे, रामप्रसाद बोराडे, सटवाजी साठे, महादेव लोंढे, श्रीपाद रोडगे, शामराव मचाले, विठ्ठल गजमल, आसाराम घाटुळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.





