सेलू : सामाजिक कार्यासाठी आणि वर्तमान परिस्थितीवर निर्भीड व अचूक फेसबुक पोस्ट्स लिहिल्याबद्दल, सेलू येथील रहिवासी आणि ताडबोरगाव येथील राजीव गांधी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक असलेले शेख महेमुद यांना त्रेतायुग फाउंडेशन, अयोध्या यांच्या वतीने ‘राष्ट्रीय वीररत्न ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नसल्याने, हा पुरस्कार त्यांना पोस्टाने पाठवण्यात आला. यापूर्वीही, त्यांना ‘जीवन गौरव’, ‘मराठवाडा भूषण’, ‘महाराष्ट्र रतन’, ‘आदर्श शिक्षक’, ‘सर्वश्रेष्ठ समाजसेवक’ आणि ‘बेस्ट स्टोरी रायटर’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. शेख महेमुद यांना ‘राष्ट्रीय वीर रतन’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच
स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...





