निलम शिर्के सामंत यांचे प्रतिपादन; साहित्य संमेलनात बालकट्याचे उद्घाटन
सेलू (कै. दत्तात्रय हेलसकर बाल कट्टा रंगमंच) : ईश्वराने तुम्हाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे तुमचं बालपण. बालपणा मध्ये तुम्ही जे मनसोक्त जगता, मौज, मजा, मस्ती करता. कलेचा आस्वाद घेता व कला सादरीकरण करता हीच खरी आयुष्यभराची शिदोरी आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या राज्यअध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांनी केले. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान आयोजितपरभणी जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनात रविवार ( दि. १६ ) रोजी कै. कमलाबाई बाहेती सभागृहात बाल कट्ट्याचे उद्घाटन सोहळा याप्रसंगी त्या बोलत होत्या.
कै. दत्तात्रय हेलसकर बाल कट्टा रंगमंचावर झालेल्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी , नीलिमा शिर्के-सामंत, बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड, संयोजन समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर , स्वागताध्यक्ष सर्जेराव लहाने, निशा पाटील, विजया कोठेकर, डॉ. राजेश गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना शिर्के सामंत म्हणाल्या,” की बालपणामध्ये आपल्यातील असणारे कलागुण जोपासले तर आयुष्य खूप सुंदर बनत. पालकांसाठी कला साहित्य व इतर क्षेत्रात बालरंग परिषदेच्या वतीने आमचे कार्य चालू आहे .विद्यार्थ्यांचं बालपण सर्वांग सुंदर झाल पाहिजे. असेही त्या म्हणाले संमेलनाचे प्रमुख पाहुणे बालकवी एकनाथ आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अनोख्या शैलीतून मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव गव्हाणे यांनी केले सूत्रसंचालन काशिनाथ पल्लेवाड तर अतुल पाटील यांनी आभार मानलेया बालकट्ट्यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला कुंडी, एल. के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू व नृसिंह माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पोखरणी येथील बालकलावंतांनी बालनाट्य सादर केले.बालकवींनी सादर केल्या उत्कृष्ट काव्यरचना बालकवी संमेलनामध्ये बालकलावंतांनी उत्कृष्ट कविता सादर केल्या. प्रांजल गाडेकर, संस्कृती गाडेकर, तेजस्विनी पावडे, प्राची पवार, अनया ढाकणे, क्षितिजा खजिने, मयुरी गुट्टे , साक्षी चव्हाण, केदार राऊत, संस्कृती मोगल कल्याणी आडे, भालेराव यांनी कविता सादर केल्या. नम्रता वाघ यांनी या विद्यार्थिनीने सादर केलेली माझी संस्कृती ही कविता उपस्थितनै भावली. बालकवी संमेलनाचे सूत्रसंचालन अनुष्का हिवाळे यांनी केले. यावेळी अनुष्का हिवाळे त्यांनी सादर केलेल्या बाल कवितेला उपस्थितांनी मोठी दाद दिली. बालकथाकारांचा उत्कृष्ट आविष्कारया बालकट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांनी कथा सादर केल्या यामध्ये प्रांजल गाडेकर, निदा शेख, अक्षदा ताठे, पुनम मोगल, स्वरा देशपांडे, साक्षी राठोड, साक्षी गजमल, संस्कृती पुजारी आदींनी कथा सादर केल्या. या कार्यक्रमास मसापाच्या सदस्या सरोज देशपांडे कथाकार अर्चना डावरे यांची उपस्थिती होतीबाल कट्टा यशस्वीतेसाठी शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापुरकर, नागेश देशमुख, डॉ. यशवंत कुलकर्णी, सपना काला, कल्पना हेलसकर, यांनी पुढाकार घेतला.





