परभणी : ग्रामीण भागात शेत रस्ते, गाडीमार्ग व पायमार्ग यांचे सीमांकन, नोंदी आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी परभणी येथे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, भारत गंगावणे, राजकुमार राठोड यांच्यासह भूमी अभिलेख, पंचायत समिती आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, “ग्रामीण रस्त्यांचे अद्ययावतीकरण आणि अतिक्रमणमुक्तता हे विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतींच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी करावा. यामुळे शेतकऱ्यांना शेतात पोहोचणे सोपे होईल आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येईल. रस्ते हे गावाच्या विकासाचे प्रतीक आहेत, त्यामुळे सर्व रस्ते मोकळे करून विकासाचा मार्ग सुकर करा.” या कार्यक्रमादरम्यान मराठा-कुणबी यांच्या हैदराबाद गॅझेटनुसार कार्यवाही करण्यासाठी ग्रामस्तरीय समितीची रचना, त्यांची कामे आणि अहवाल सादर करण्याच्या पद्धतीबाबतही समित्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास
साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...





