देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

टीईटीला १०,४०८ परीक्षार्थी हजर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 24, 2025
in परभणी, मराठवाडा
0
टीईटीला १०,४०८ परीक्षार्थी हजर
Please Share

सर्व केंद्रावर परीक्षा शांततेत व सुरळीत, ६४९ जणांची दांडी

परभणी : शिक्षक पदासाठी अनिवार्य केलेली शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) चे दोन पेपर रविवारी (दि.२३) ३६ केंद्रावर घेण्यात आले. यात सकाळच्या सत्रातील पहिल्या पेपरसाठी १६ केंद्रावर प्रविष्ठ असलेल्या ४ हजार ९४८ पैकी ४ हजार ६४१ तर दुपारच्या सत्रातील दुसऱ्या पेपरसाठी २० केंद्रांवर प्रविष्ठ असलेल्या ६ हजार १०९ पैकी ५ हजार ७६७परीक्षार्थी हजर राहिले होते. या दोन्ही पेपरला एकुण ६४९ परीक्षार्थी गैरहजर असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यात रविवारी, २३ नोव्हेंबररोजी सुरळीत, शांततेत व शिस्तबध्द वातावरणात ही परीक्षा पार पडली. परीक्षे दरम्यान कोणताही अनवधानाने किंवा अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, पोलीस व महसूल यंत्रणेच्या प्रभावी समन्वयामुळे परीक्षा वेळेत व विना अडथळा पार पडल्याचे जिल्हा परीक्षा सनियंत्रण समितीने जाहीर केले. अधिकाऱ्यांनी विविध केंद्रावर जात सीसीटीव्ही नियंत्रण, प्रश्नपत्रिका वितरण, सुरक्षा व्यवस्था, परीरक्षकांची उपस्थिर्तीची पाहणी केली. सर्वत्र व्यवस्था समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर अनेक अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिल पोलास यांनी जिल्हा परीक्षा सनियंत्रण समिती सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम केले. विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांनी सहाय्यक परीरक्षक म्हणून तर जिल्हा परीरक्षक मंगेश नरवाडे यांनी विविध केंद्रांतील पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडली. तसेच पोलीस व महसूल विभागाचेही योगदान महत्वाचे ठरले असून पोलीसांकडून सर्व केंद्रांवर योग्य सुरक्षा बंदोबस्त होता.
महसूल विभाग, जिल्हा परिषद, तसेच संबंधित संस्थांचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनांनीही आपापली जबाबदारी काटेकोर पार पाडल्याने संपूर्ण परीक्षा कोणत्याही गोंधळाविना यशस्वी,झाली. परीक्षेच्या सर्व टप्प्यांत पारदर्शकता राखत ती शांततेत व व्यवस्थित पूर्ण झाली. सर्व विभागांचा समन्वय उत्कृष्ट होता, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिल पोलास यांनी सांगितले.

Post Views: 1,486
Please Share
Previous Post

विद्यार्थ्यांनी लुटला विमान सफरीचा आनंद

Next Post

भांगडिया जयंती महोत्सव आजपासून

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भांगडिया जयंती महोत्सव आजपासून

भांगडिया जयंती महोत्सव आजपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ