देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

५६९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 17, 2026
in परभणी
0
५६९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
Please Share

जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १०१ तर परभणीत ८८ ग्रामपंचायतींचा समावेश, मे महिन्यापर्यंत चालणार प्रभाग रचनेची प्रक्रिया

परभणी/प्रतिनिधी : माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमामुळे परभणी जिल्ह्यातील ५६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून राजकीय क्षेत्रात मोठ्या हालचालींना वेग आला आहे.

जिल्ह्यातील तालुकावार ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १०१ ग्रामपंचायती आहेत. त्याखालोखाल परभणी तालुक्यात ८८, गंगाखेड ७१, सेलू ६७, पूर्णा ६५, पालम ५३, पाथरी ४२ आणि मानवत व सोनपेठमध्ये प्रत्येकी ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामविकास मंत्रालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या प्रभाग रचनेच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे.निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदारांना २० फेब्रुवारीपर्यंत गुगल अर्थचे नकाशे अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर तलाठी आणि ग्रामसेवकांनी संयुक्त स्थळ पाहणी करून २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग व त्यांच्या सीमा निश्चित करायच्या आहेत. ५ मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी तहसीलदारांच्या समितीमार्फत केली जाईल. उपविभागीय अधिकारी ११ मार्चपर्यंत हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील आणि जिल्हाधिकारी १७ मार्चपर्यंत संक्षिप्त तपासणी करून तो प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवतील.निवडणूक आयोगाने २३ मार्चपर्यंत प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर ३० मार्चपर्यंत प्रभाग रचनेचे काम पूर्ण केले जाईल. या प्रक्रियेत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यासाठी ७ एप्रिल रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. १३ एप्रिलपर्यंत हरकती स्वीकारून २१ एप्रिलपर्यंत त्यावर सुनावणी घेतली जाईल. अखेर २८ एप्रिल रोजी प्रभाग रचना अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल आणि ४ मे रोजी जिल्हाधिकारी या अंतिम प्रभाग रचनेला अधिकृत मान्यता देतील. या सविस्तर कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मतदानाचा मार्ग मोकळा होणार असल्याने ग्रामीण भागातील इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Post Views: 1,639
Please Share
Previous Post

महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन कार्यशाळा उत्साहात

Next Post

वालूरच्या जिप मराठी शाळेत ‘आनंदनगरी’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वालूरच्या जिप मराठी शाळेत 'आनंदनगरी'

वालूरच्या जिप मराठी शाळेत 'आनंदनगरी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ