देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

शेतपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत

admin by admin
July 26, 2025
in मराठवाडा
0
विभागीय आयुक्त पापळकर यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
Please Share

विभागीय आयुक्त पापळकर यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

परभणी : परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे व नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकरी व नागरिकांना एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) आणि एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील तरतुदींनुसार आर्थिक मदत देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले आहेत. दरम्यान, या अनुषंगाने जिल्हाप्रशासनाने तालुकास्तराव विशेष पथके गठीत करून कार्यवाही सुरू केली आहे.

१५ मंडळात अतिवृष्टीने मोठे नुकसान

१७ जुलैरोजी परभणी तालुक्यातील पेडगाव व जांब, पाथरी तालुक्यातील पाथरी, हादगाव व कासापुरी, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, वाधी धानोरा, सेलू तालुक्यातील सेलू, देऊळगाव, चिकलठाणा, मोरेगाव, आणि मानवत तालुक्यातील मानवत महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर २२ जुलैरोजी पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव, कासापुरी, जिंतूर तालुक्यातील बोरी, वाधी धानोरा, सेलू तालुक्यातील चिकलठाणा, मोरेगाव, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ आणि मानवत तालुक्यातील केकरजवळा या महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टी झाली.

पथके गठीत, बाधितांना लवकरच मदत मिळणार

विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार, जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी २४ जुलै रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या आणि घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंच्या नुकसानीचे पंचनामे करून, बाधित शेतकरी व नागरिकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफमधील तरतुदींनुसार लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने, तालुकास्तरावरुन विशेष पथके गठीत करण्यात आली असून, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. निकषानुसार आर्थिक मदत देण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल, असे प्रशासनाने कळवले आहे.

Post Views: 1,072
Please Share
Previous Post

ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षा : राजवाडीच्या शाळेतील ३३ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रारंभ

admin

admin

Next Post
सेलूत श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रारंभ

श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ