परभणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या सात नगरपालिका/नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, पहिल्या दोन तासांमध्ये (सकाळी ९.३० वाजेपर्यंत) अनेक ठिकाणी मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सरासरी ८.७१ टक्के मतदान झाले आहे.
मतदानाची सद्यस्थिती (७.३० ते ९.३० पर्यंत)
सकाळच्या सत्रातील आकडेवारीनुसार, जिंतूर नगरपालिकेमध्ये मतदानाचा टक्का सर्वाधिक दिसून आला आहे. जिंतूरमध्ये एकूण ४१ हजार ८०७ मतदारांपैकी ५ हजार ४३८ मतदारांनी (१३.०१%) मतदान केले. त्यापाठोपाठ पाथरी नगरपालिकेमध्ये ३ हजार ९५२ मतदारांनी (११.२२%) आपला मतदानाचा हक्क बजावला. पूर्णा ८.८८% , गंगाखेड ८.०६% , सेलू ८.०२%, पाथरी ११.२२%, मानवत ६.२९%, जिंतूर १३.०१%, सोनपेठ ९.६०% या आकडेवारीनुसार, सकाळच्या सत्रात जिंतूरमध्ये सर्वाधिक १३.०१ टक्के आणि मानवतमध्ये सर्वात कमी ६.२९ टक्के मतदान झाले आहे.मतदारांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. दुपारच्या सत्रात मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली आहे.





