सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा, स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या महाभारत कथेचे आयोजन

सेलू : सेलू शहरातील सातोना रोडवरील मयुरी पार्क परिसरात १२ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ‘फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याच्या’ पूर्वतयारीला वेग आला आहे. या सोहळ्याचे नियोजन सुलभ व्हावे, या उद्देशाने सातोना रोडवरील वैष्णवी ट्रेडर्सच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले. नगराध्यक्ष मिलींद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, साईबाबा बॅंकचे अध्यक्ष हेमंतराव आडकळर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी उद्योजक जयप्रकाश बिहाणी, महेश खारकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव मगर, चंद्रशखर मुळावेकर, जयराम महाराज तांगडे, कृष्णा महाराज रासवे, दत्तराव पावडे, अविनाश बिहाणी, महादेव ढवळे, माऊली चव्हाण, संजय पिंपळगावकर, रामप्रसाद चव्हाण , मारोती वाघ, श्रीपाद मसलेकर , एकनाथ कटारे, योगेश सोळंके, अच्युत्तराव आंधळे , सुदाम जाधव, किसन खेडेकर , नामदेव आवटे, देवराव आबुज, ओमकार टेकाळे, मोहन हातकडके, सुनील गायकवाड, चंद्रकांत कुलकर्णी, रामेश्वर लाटे, विलास पाटील, शंकर लाटे, दत्तराव झोल, विठ्ठलराव झोल, नबाजी खेडेकर आदींसह अनेक मान्यवर तसेच ज्ञानेश्वरी प्रचारक आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या आठवडाभराच्या या सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण, स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून महाभारत कथा आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आणि समन्वयासाठी हे संपर्क कार्यालय आता कार्यरत राहणार असून, भाविकांनी अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा, असे आवाहन समस्त प्रचारक व ज्ञानेश्वरी प्रचारक उपासक यांच्या वतीने करण्यात आले आहे.





