महापौर सय्यद इकबाल यांचे प्रतिपादन
परभणी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नव्हे तर संपूर्ण वर्षभर महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन महापौर सय्यद इकबाल यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने ८ मार्च रोजी बी. रघुनाथ सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटनेत्या तिरुमला खिल्लारे, गिरजा आजेगावकर, सपना जुक्टे, सुशिला थोरात, राजेश रणखांबे, उषा अवचार, मोईन मौली, डॉ. कल्पना सावंत, गजानन जाधव, राजकुमार जाधव, रामेश्वर कुलकर्णी आणि सहाय्यक आयुक्त जुबेर हाशमी यांची प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्यात अर्चना डावरे, रूपाली लहेकर, मनिषा उमरीकर, अनुराधा वायकोस, श्रेया लव्हेकर, शरयू टेकाळे, गौरी पाते पाटील आणि राणुबाई वायवळ यांचा गौरव करण्यात आला. तसेच महापालिकेतील निकहत फातेमा, नुझहत बेगम, शहाना परवीन, समिना शहाबोद्दीन आणि आरोग्य विभागातील डॉ. नहित फातेमा, डॉ. आयेशा समरीन, डॉ. साबीहा फरहत, डॉ. अदिती जोंधळे व डॉ. विद्या पवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार झाला. सूत्रसंचालन सीमंतिनी कुंडीकर यांनी केले तर आभार डॉ.कल्पना सावंत यांनी मानले.





