देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विवेकानंद विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 13, 2026
in परभणी
0
विवेकानंद विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार
Please Share

जिद्द व परिश्रमाने यश प्राप्त होते : करूणा कुलकर्णी

सेलू : कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य, नियोजित अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्कीच मिळते असे मत करुणा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (बी.डी.एस.) व राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना करुणा कुलकर्णी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा आणि काही शंका असल्यास मार्गदर्शक शिक्षकांकडून त्या सोडवून घ्याव्यात. जिद्द आणि कठोर परिश्रम हेच यशाचे खरे गमक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करुणा कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपेंद्र बेल्लुरकर उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे, रागिणी जकाते, अनिल कौसडीकर आणि शंकर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांनी विद्यार्थी दशेतच उत्तम नागरिक घडण्याचे संस्कार आत्मसात करून शाळेचा नावलौकिक वाढवावा अशी मनीषा व्यक्त केली. तसेच या परीक्षेत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव एकशिंगे यांनी केले तर सूत्रसंचालन चंदू कव्हळे यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन चेतन नाईक यांनी केले आणि आभार स्वप्नाली देवडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,638
Please Share
Previous Post

मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Next Post

एचपीव्ही लसीकरण : सेलूत तालुका शीघ्र पथकाची बैठक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
एचपीव्ही लसीकरण : सेलूत तालुका शीघ्र पथकाची बैठक

एचपीव्ही लसीकरण : सेलूत तालुका शीघ्र पथकाची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ