देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

वारकरी संप्रदाय निष्कामतेच्या पायावर उभा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 14, 2026
in मराठवाडा
0
वारकरी संप्रदाय निष्कामतेच्या पायावर उभा
Please Share

बंडा तात्या कराडकर महाराज : सेलू येथे फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यात भाविकांची रीघ

सेलू : वारकरी संप्रदाय हा निष्कामतेच्या पायावर उभा आहे. जिथे निष्कामता असते, तिथेच खरे ऐश्वर्य निर्माण होते. आज समाजात विवेकाची जागा विकाराने आणि वैराग्याची जागा वैभवाने घेतली आहे, अशा काळात निष्काम भावनेने केलेली लोकसेवाच शाश्वत टिकते, असे प्रतिपादन संतवीर श्रीगुरु बंडा तात्या कराडकर यांनी केले.
सेलू शहरातील अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या ‘काय उणे आम्हा विठोबाचे पाय’ या अभंगावर निरूपण केले.

बंडा तात्या पुढे म्हणाले की, जगात सुखाबद्दल सर्वांचे एकमत आहे, पण सुख शोधण्याची जागा चुकली आहे. माणसे बाहेर सुख शोधत आहेत, पण सुख आपल्याच पाशी आहे. देवाकडे ऐश्वर्य, सत्ता आणि औदार्य हे तीनही गुण आहेत. जो विठ्ठलाच्या चरणी अनन्यभावाने शरण जातो, त्याला कशाचीही उणीव भासत नाही. आजच्या काळात मोबाईल हा वेळ खाणारा राक्षस बनला असून, तरुणांनी यापासून सावध राहण्याची गरज आहे.
या सोहळ्याचे नियोजन करणाऱ्या पंडित महाराज यांच्या कार्याचे तात्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, समाजाने गुणांच्या पाठीमागे उभे राहावे. गेल्या पाच वर्षांपासून ज्ञानेश्वरीचा प्रचार घराघरात करणाऱ्या या उपक्रमाला समाजाची मिळालेली साथ ही निष्कामतेची पावती आहे. यावेळी त्यांनी आगामी काळात ज्येष्ठ कीर्तनकारांच्या तारखा मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
कार्यक्रमाला भाविकांची अलोट गर्दी होती. याप्रसंगी स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी महाजांचा सत्कार केला. कीर्तनानंतर आरती होऊन सोहळ्याची सांगता झाली.

बंडा तात्या कराडकर म्हणाले…

जगात कोणत्याही विषयावर एकमत होणार नाही, पण ‘सुख’ या शब्दावर जगाचे एकमत होते. सुख कोणाला नको असे नाही आणि दुःख कोणाला हवे असे नाही. पण आपले सुख शोधण्याचे ठिकाण चुकले आहे. तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी, अशी आपली अवस्था झाली आहे.

देवाकडे तीन मोठे गुण आहेत. पहिले म्हणजे वैभव किंवा ऐश्वर्य. ज्याच्या दासी रिद्धी-सिद्धी आहेत, त्या विठोबाच्या पायी आम्हाला काहीही उणे नाही. दुसरा गुण म्हणजे सत्ता. जगाचा मालक असलेल्या पांडुरंगाची सत्ता अचाट आहे. आणि तिसरा गुण म्हणजे औदार्य. तो मोक्ष देणारा दाता आहे.

वारकरी संप्रदायाला मानधनाची कीड लागली आहे. मानधन म्हणजे मानाने दिलेले धन, पण आज ते मागून घेतले जाते, त्याला मजुरी म्हणतात. अशा काळात विना मानधन, विना पावती आणि विना देणगी होणारे हे कार्यक्रम समाजासाठी आदर्श आहेत. समाज सत्तेच्या किंवा पैशाच्या मागे जात नाही, तर तो गुणांच्या मागे जातो. जिथे प्रामाणिकपणा आणि निष्कामता असते, तिथे समाज स्वतःहून धावून येतो.

Post Views: 1,887
Please Share
Previous Post

महिलांनी एकमेकींचा आधार बनावे

Next Post

राज्यमंत्री बोर्डीकर यांना अमरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राज्यमंत्री बोर्डीकर यांना अमरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

राज्यमंत्री बोर्डीकर यांना अमरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ