सात जूनला आयोजन : शब्दसह्याद्री, अक्षर प्रतिष्ठान आणि ‘स्वाराती’ ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम
सेलू, दि.२ जून : येथील शब्दसह्याद्री, अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने रविवार, दि. ०७ जून रोजी एका विशेष कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नूतन विद्यालयाच्या रा. बा. गिल्डा सभागृहात सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्रातील नामवंत कवींची बहारदार काव्य मैफल ‘कविता मिरगाच्या’ रंगणार आहे.शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या ‘कविता मिरगाच्या’ या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष आहे. या वर्षीच्या काव्य मैफलीत युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. वीरा राठोड (कन्नड), डॉ. ऊर्मिला चाकूरकर (पैठण), प्रा. सखाराम डाखोरे (मुंबई), राजकुमार नायक (हिंगोली) आणि प्रेमानंद शिंदे (वसमत) हे निमंत्रित कवी प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. या कवी संमेलनाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचलन कवी डॉ. अशोक पाठक करणार आहेत.या भरगच्च कवी संमेलनास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सर्जेराव लहाने, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, महेशराव खारकर, डॉ. सतीश मगर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, रमेश नखाते, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, एकनाथ जाधव, चंद्रशेखर मुळावेकर, माधव गव्हाणे, सुभाष मोहकरे आणि बाळू बुधवंत यांनी केले आहे.





