१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन
वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य सेवा २०२६ अंतर्गत ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या आशीर्वादाने हा सोहळा सलग दुसऱ्या वर्षी भक्तिभावाने पार पडत आहे.या सोहळ्यात ह.भ.प. शंतनु महाराज पाठक (वालूरकर) हे श्रीज्ञानेश्वरीतील अध्यात्मिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या तत्त्वज्ञानावर निरूपण करणार आहेत. ज्ञानेश्वरीतील भक्ती आणि ज्ञानाचा संगम भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.हा चिंतन सोहळा श्रावण शुद्ध प्रतिपदा, १३ ऑगस्ट २०२६ पासून दररोज रात्री ९.०० ते १०.०० या वेळेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्रीक्षेत्र वालूर येथे पार पडणार आहे. चातुर्मासाच्या या पावन पर्वावर सर्व वारकरी व धर्मप्रेमी भाविकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देगलूरकर वारकरी शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.





