सेलूतील शेतकऱ्यांचे निवेदन, रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा
सेलू : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमाफी योजना २०२६ मधील जाचक अटी आणि शर्तींविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.
या संदर्भात सेलूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे सहकार मंत्री तसेच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना निवेदन सादर करण्यात आले.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्ती शेतकरी वर्गासाठी जाचक ठरत आहेत. शेतकरी हिताचा विचार करून राज्य शासनाने या जाचक अटी शिथिल कराव्यात आणि सर्व थकीत पीक कर्जधारक शेतकऱ्यांचे सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनावर पंडितराव आरकुले, राजेंद्र नावडे, दत्तुसिंग ठाकूर, भगतसिंग ठाकूर, प्रताप जाधव, मनोज कुळथे, महेश वाघ, रामप्रसाद घुमरे, रामेश्वर जाधव, शिवाजी दळवे, अनंत खुळे, निवृत्ती कवडे, आसाराम आवटे, ज्ञानेश्वर जाधव, बळीराम आवटे, नारायण दळवे, गंगाधर आवटे, विष्णू जाधव, बाळासाहेब शिंदे, विठ्ठल मगर, मोहन देशपांडे, सुनील टाक यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





