मानसोपचारतज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक यांचे मत, सेलूतील ‘स्वाराती’ ग्रंथालयात कार्यक्रम
सेलू जि.परभणी : आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत दुःखी होतो. प्रत्येक व्यक्तीने माझ्या सोबत चांगलेच वागले पाहिजे, असे आपल्याला वाटते. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसऱ्याला बदलण्याच्या नादात आपण आपला आनंद विसरून जातो. त्यामुळे आनंदी जीवन जगायचे असेल, तर स्वतःला बदलले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक यांनी केले.
सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने डॉ आनंद नाडकर्णी यांच्या ‘स्वभाव- विभाव’ या पुस्तकावर ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमाच्या ४१ व्या पुष्पात बोलताना केले.डॉ.नाईक म्हणाले, ” आपल्या आनंदाचा कंट्रोल आपण दुसऱ्यांकडे जाऊ न देता स्वत:चे विचार बदलून आनंदी जीवन जगले पाहिजे.” अध्यक्षस्थानी डॉ.सुनील कुलकर्णी होते. त्यांनी डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या कार्याचा आढावा घेतला.प्रास्ताविक डॉ.हर्षा माकोडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.स्मिता देऊळगावकर यांनी केले. श्रीपाद कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ.एन.व्ही.सिंगापुरे, प्रा. माणिक लिंगायत, हेमंतराव आडळकर, जयप्रकाश बिहाणी, सर्जेराव लहाने, तुळशीराम घोडकेगंगाधर गुंजकर, मेघना बेल्लूरकर, संजय पिंपळगावकर, शैलजा अंबेकर, यशवंत चारठाणकर, भाग्यश्री किर्तनकार, उदय रोडगे यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.शरद ठाकर यांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या ग्रंथालय निर्मिती उपक्रमांतर्गत प्रकाशित झालेल्या “आभाळाचे स्वप्न” या कवितासंग्रहात कवितांची निवड झाल्या बद्दल ग्रंथालयाचे सदस्य डॉ.शरद ठाकर यांचा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...
ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...
सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...