मुंबई, दि १२ : राज्यातून नैऋत्य मान्सूनने निरोप घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून हवामान पूर्णपणे कोरडे झाले होते. मात्र, १५ ऑक्टोबरपासून राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान तसेच दुपारनंतर वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार, वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता विदर्भ आणि मराठवाड्यात आहे. या दोन विभागांमध्ये अनेक ठिकाणी ढगाळ हवामान किंवा वादळी पाऊस हजेरी लावू शकतो. त्या तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात काही विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांनी या हवामान स्थितीनुसार योग्य नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन केले आहे.
श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता
सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...





