सेलू: महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ३१ मे ते १४ जून या कालावधीत काढण्यात आली आहे. या संवाद यात्रेचे सोमवार, दिनांक ११ मे रोजी दुपारी ४ वाजता मानवत तालुक्यातील श्री क्षेत्र ऋषीश्वर महाराज समाधीस्थळ, दुधना बेट मगर सावंगी येथे आगमन होणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा पहिल्यांदाच येत असून, यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन चिलवंत व मुकुंद मगर यांनी केले आहे.
भारतीय संस्कृतीचा कणा आणि मानवी आरोग्याचे उगमस्थान असलेल्या देशी गोवंशाचे महत्त्व सर्वांना कळावे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. पुरुषोत्तम मासानिमित्त या गोसंवाद यात्रेत गोमाता महाआरती, महापूजन सोहळा, गोमाता विजय संस्कृती गोपूजन, गोपालकांचा स्नेह मेळावा आणि गो संस्कृती नोंदणी अभियान अशा विविध आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व उपक्रमांमध्ये गोसेवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी केले आहे. या संवाद यात्रेच्या यशस्वीतेसाठी आयोजक नितीन चिलवंत, मुकुंद मगर व संयोजन समितीचे सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत. या निमित्ताने गोवंश संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भारतीय संस्कृतीचा कणा आणि मानवी आरोग्याचे उगमस्थान असलेल्या देशी गोवंशाचे महत्व जाणून घेण्यासाठी पुरुषोत्तम मासा निमित्य गोसंवाद यात्रे निमित्य गो माता महाआरती, महापुजन सोहळा, गो माता विजय संस्कृती गोपुजन, गोपालकांचा स्नेह मेळावा गो संस्कृती नोंदणी अभियान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात गोसेवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी केले असून आयोजक नितीन चिलवंत, मुकुंद मगर व संयोजन समितीच्या वतीने करण्यात गो संवाद यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले जात आहेत.





