परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचलनालयामार्फत “माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमांतर्गत आर्वी (ता. परभणी) येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसोबत प्रक्षेत्र भेट आणि गटचर्चा आयोजित करण्यात आली. या वेळी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत धैर्य दिले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत उपस्थित होते.
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांना खचून न जाता रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, करडई, जवस यांसारख्या पिकांची नियोजनबद्ध लागवड करण्याचे आवाहन केले. हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमात आर्वी पंचक्रोशीतील सुमारे ६५ शेतकऱ्यांचा सहभाग होता.
ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच
स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...





