परभणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी लक्ष ठेवले आहे. त्यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. १७ सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता
सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...





