परभणी : जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रभावी कामगिरी करत १५ बालविवाह रोखले आहेत. या काळात एकूण १९ प्रकरणांपैकी ४ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली, तर १५ मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
भारत सरकारच्या ‘बालविवाहमुक्त भारत’ अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यात जानेवारी २०२६ पर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. कोठेही बालविवाह होत असल्यास १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल. कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ वर्षे असणे बंधनकारक असून, उल्लंघन केल्यास पालकांसह भटजी, मंगल कार्यालय आणि इतर सेवापुरवठादारांना दोन वर्षांचा तुरुंगवास व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता
सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...





