देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized

आता उद्योग उभारणी झाली सोपी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2025
in Uncategorized
0
आता उद्योग उभारणी झाली सोपी
Please Share

महाराष्ट्रात उद्योजकांसाठी ‘मैत्री’ कायदा-२०२३ लागू

परभणी : महाराष्ट्राला देशातील आणि जगातील गुंतवणुकीचे केंद्र बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा’ म्हणजेच ‘मैत्री’ कायदा-२०२३ लागू करण्यात आला आहे. या कायद्यामुळे उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सरकारी परवानग्या आणि सेवा एकाच ठिकाणी आणि जलदगतीने मिळतील.’मैत्री’ कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये: एक खिडकी योजना : या योजनेमुळे उद्योजकांना विविध सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही. सर्व परवानग्यांसाठी अर्ज करणे आणि त्यांची स्थिती तपासणे एकाच ऑनलाइन पोर्टलवर शक्य आहे. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.वेळेचे बंधन: प्रत्येक परवानगीसाठी एक निश्चित कालावधी ठरवण्यात आला आहे. जर त्या वेळेत संबंधित विभागाने मंजुरी दिली नाही, तर अर्ज मंजूर झाला आहे, असे मानले जाईल.पारदर्शकता आणि वेग: ऑनलाइन प्रक्रियेमुळे कामात पारदर्शकता येते आणि प्रत्येक टप्प्यावर अर्जाची स्थिती तपासता येते.तक्रार निवारण: काही अडचण आल्यास किंवा वेळेत सेवा न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी दोन विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.या कायद्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल, नवीन रोजगार निर्माण होतील आणि राज्याची व्यवसाय सुलभता वाढेल अशी अपेक्षा आहे. लहान-मोठे उद्योजक, नवउद्योजक आणि परदेशी गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा होणार आहे.अधिक माहितीसाठी :उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी सर्व माहिती देण्यासाठी उद्योग विभागाच्या अंतर्गत ‘मैत्री-सेल’ या नावाने कॉल सेंटर सुरू आहे. यासाठी १८००२३३२०३३ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२२-२२६२२३२२, ०२२-२२६२२३६१ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, मुळे हॉस्पिटलशेजारी, शिवाजीनगर, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा ‘मैत्री’ कायदा – उद्योगमंत्री उदय सामंत

Post Views: 1,256
Please Share
Previous Post

नियमबाह्य भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे सेलूत बेमुदत उपोषण

Next Post

‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ : ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार विज्ञानाचे धडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ : ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार विज्ञानाचे धडे

'फिरती विज्ञान प्रयोगशाळा' : ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार विज्ञानाचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ