देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कालिदास महाराज यांचे अपघाती निधन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 17, 2026
in परभणी
0
कालिदास महाराज यांचे अपघाती निधन
Please Share

दत्त संप्रदाय, शिष्य परिवारावर शोककळा; श्रीक्षेत्र गुंज येथे होणार अंत्यसंस्कार

परभणी : शिवाश्रम, गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील परमपूज्य कालिदास महाराज बोरीकर यांचे शुक्रवार, १७ जुलै २०३६ रोजी सकाळी अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुजरात मधील गरुडेश्वर येथील एक धार्मिक कार्यक्रम आटोपून महाराज छत्रपती संभाजीनगर येथे येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर निपाणी फाट्याजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच महाराजांचा शिष्यपरिवार धावून आला. शहरातील एका खाजगी रुग्णालयात महाराजांना दाखल करण्यात आले परंतु काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यावेळी महाराजांसमवेत त्यांच्या लहान भावाची पत्नी स्मिता हणमंतराव बोरीकर रा. सातारा या देखील होत्या. त्यांचेही या अपघातात निधन झाले. महाराजांच्या दुसऱ्या लहान भावाचे जावई सेलूचे आशुतोष डुघरेकर हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील संस्कार उद्या शनिवारी, १८ जुलै रोजी सकाळी गुंज येथे होणार आहेत. महाराजांचा केवळ मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यात देखील खूप मोठा शिष्य परिवार आहे. परमपूज्य कालिदास महाराज हे ब्रह्मचारी व मौनी होते. केवळ दत्त गुरूंच्या आराधनेची पंचपदी वगळता ते कायम मौनात असत. कालिदास महाराजांच्या निधनामुळे सर्वदूर पसरलेल्या त्यांच्या शिष्य परिवारावर शोककळा पसरली आहे.

दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार

परमपूज्य कालिदास महाराज यांनी मागची ४० वर्षे मौनव्रत स्वीकारून महाराष्ट्रभर दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. हजारो लोकांना भक्तिमार्गाला लावून समाज सत्कार्यी लागावा, निर्व्यसनी व्हावा यासाठी त्यांनी अविरतपणे काम केलं. अध्यात्म, तपश्चर्या आणि सेवाभावासाठी ते ओळखले जात होते. त्यांनी सुमारे ४० वर्षे अखंड मौनव्रत पाळल्यामुळे त्यांची विशेष ख्याती होती. मौन असूनही ते भाविकांना आशीर्वाद देत आणि अनेक जण त्यांना संतस्वरूप मानत. साधेपणा, संयम, ईश्वरभक्ती आणि लोककल्याण यांचा संदेश त्यांनी आपल्या जीवनातून दिला. त्यांच्या निधनामुळे भक्तपरिवारात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मौनातून अध्यात्माचा संदेश देणारे परमपूज्य कालिदास महाराज यांचे तपस्वी जीवन, त्याग, साधना आणि आध्यात्मिक प्रेरणा भाविकांच्या स्मरणात सदैव राहतील.

Post Views: 1,173
Please Share
Previous Post

एसआयआर प्रशिक्षणाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ