देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

समृद्धी महामार्ग : २४ एकर शेतीचे दोन तुकडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 19, 2026
in परभणी
0
समृद्धी महामार्ग : २४ एकर शेतीचे दोन तुकडे
Please Share

रायपूरच्या शेतकऱ्यांची व्यथा : विहिरीसह शेतआखाडा उद्ध्वस्त, गाडेकर कुटुंबासह १२ शेतकरी हवालदिल

सेलू : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना- परभणी – नांदेड द्रुतगती महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीमुळे अनेक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी रामेश्वर गाडेकर यांच्या वडिलापार्जित २४ एकर शेतीमधील ४ एकर जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. यामुळे शेती दोन तुकड्यात विभागली गेली आहे.

मात्र, या संपादनामुळे संपूर्ण गाडेकर कुटुंब व ११ शेतकरी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. बागायती जमीन असतानाही केवळ नाममात्र भरपाई आणि प्रशासकीय त्रुटींमुळे शेतकऱ्यावर मोठा अन्याय झाल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.शेतकरी रामेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपादित केलेली जमीन पूर्णपणे बागायती असून, जमिनीवर विहीर व इतर पाण्याचे स्त्रोत होते. शासनाचा नियमानुसार सर्व वायदा देखील वेळोवेळी भरलेला आहे. असे असतानाही महसूल नोंदींमधील त्रुटींमुळे किंवा नादुरुस्तीमुळे या बागायती जमिनीचे मूल्यांकन ‘कोरडवाहू’ म्हणून करण्यात आले आहे. रेडीरेकनरच्या दराप्रमाणे १ लाख ७१ हजार रुपयांच्या ४ पट मोबदला मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ ३७७ रुपये प्रति झाड या दराने अत्यंत तुटपुंजे मूल्यांकन लावून प्रशासनाने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळले आहे. १०० आंबे आणि २०० इतर झाडांची कत्तल, शेत आखाडा उद्ध्वस्त होणार आहेत. महामार्गाच्या कामात या जमिनीवरील तब्बल १०० आंब्याची आणि २०० इतर मौल्यवान झाडे बाधित झाली आहेत. या झाडांना केवळ ‘बिले’ मारून प्रशासनाने ती निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाच्या रेषेत आल्यामुळे शेतकऱ्याचा पिढीजात शेत आखाडा आणि विहीर पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. वर्षानुवर्षे कष्टाने उभे केलेले घर आणि शेतीचे अस्तित्व संपत आल्याने गाडेकर कुटुंब हवालदील झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी, जमिनीचे पुनर्मूल्यांकन करून कोरडवाहू ऐवजी ‘बागायती’ दराने आणि योग्य रेडीरेकनरनुसार ४ पट मोबदला मिळावा, उद्ध्वस्त होणाऱ्या शेत आखाड्याचे व विहिरीचे योग्य मूल्यांकन करून भरपाई द्यावी, शेतीचे दोन भाग झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तात्काळ पर्यायी रस्ता मंजूर करावा, अशा मागण्या केल्या आहेत.

शेतीचे तुकडे; रस्त्याचा प्रश्न गंभीर

४ एकर जमीन नेमकी शेताच्या मधोमध संपादित झाल्यामुळे उर्वरित २० एकर शेतीचे आता दोन वेगवेगळे भाग पडले आहेत. महामार्गाच्या संरक्षण भिंतींमुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी किंवा शेतमाल आणण्यासाठी कोणताही रस्ता राहिलेला नाही. शेतजमीन असूनही तिथपर्यंत पोहोचता येत नसल्याने उर्वरित शेती कशी करायची ? असा गंभीर प्रश्न आता या १२ शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

“वडिलाोपार्जित बागायती शेती समृद्धी महामार्गात गेली. प्रशासनाने बागायती जमिनीला कोरडवाहू दाखवून केवळ ३७७ रुपये झाडाचे मूल्यांकन केले आहे. घर, विहीर, आखाडा सगळंच उद्ध्वस्त होत आहे आणि शेताचे दोन तुकडे झाल्याने उर्वरित शेतात जायला रस्ताही उरलेला नाही. हा आमच्यावर थेट अन्याय आहे. सरकारने आमची पुन्हा चौकशी करून योग्य न्याय द्यावा.” – रामेश्वर गाडेकर, बाधित शेतकरी, रायपूर ता. सेलू

Post Views: 1,706
Please Share
Previous Post

दीपस्तंभ प्रतिष्ठान प्रत्येक गरजूंमागे सक्षमपणे उभे

Next Post

काळजावर दगड ठेवून जमिनीचा दिला ताबा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
काळजावर दगड ठेवून जमिनीचा दिला ताबा

काळजावर दगड ठेवून जमिनीचा दिला ताबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ