नम्रता आणि संस्काराने माणूस मोठा होतो : कुलगुरू डॉ. इंद्र मणी
परभणी : परभणी येथील सृजनशील शिक्षक नरहरी मुटकुळे बाल साहित्य नगरीत तिसरे अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन उत्साहात झाले. संमेलनाचे उद्घाटन ॲड. रमेशराव गोळेगावकर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, वाचनाने माणूस आणि संस्कृती घडते. वाचन चळवळीचे हे कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे मत डॉ. रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केले. मोबाईल आणि टीव्हीच्या जमान्यात बालवाचक इतक्या मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पुस्तके वाचतात, हे दृश्य आनंद देणारे आहे. जिल्हा परिषदेच्या मुलांना अक्षर आनंदमुळे एक मोठे व्यासपीठ मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले. या संमेलनाचे उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी केले. संमेलनाध्यक्ष कोमल डाखोरे, स्वागताध्यक्ष अनन्या खवले आणि पी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनादरम्यान बालवाचकांनी कथाकथन, बालकवी संमेलन, नाटिका आणि वाचलेल्या पुस्तकावर गटचर्चा अशा विविध सत्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
समारोप सत्रात बालवाचकांचा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, माणूस नम्रता आणि संस्कारानेच मोठा होतो. यावेळी कांतराव देशमुख, माणिक पुरी, जयश्री औताडे यांनीही बालवाचकांना संबोधित केले. समारोप सत्राचे प्रास्ताविक बलभीम माथेले यांनी केले, तर सूत्रसंचालन इंदूमती कदम व सोमनाथ डोंगरे यांनी केले. दीपक शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हे संमेलन यशस्वी करण्यासाठी राजेश चव्हाण, अनंता कदम, दिपाली महिंद्रकर, युवराज माने, भानुदास धोत्रे, संतोष रत्नपारखे, दत्तात्रेय भोंबे, नामदेव घुले, गोपी मुंडे, मारुती डोईफोडे, रत्नमाला शेळके, नरेंद्र कांबळे, सुलोचना गिरी, शिवमाला लांडगे, नरहरी मुटकुळे आणि कैलास सुरवसे, विठ्ठल अनमुलवाड यांनी परिश्रम घेतले.





