संमेलनाध्यक्ष डॉ आसाराम लोमटे, चंद्रकांत कुलकर्णी, इंद्रजित भालेराव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती


परभणी : सेलू येथील अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन रविवार १६ नोव्हेंबर रोजी शहरातील साई नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन चित्रपट व नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत होईल. सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते साई नाट्य मंदिरापर्यंत ग्रंथ दिंडी निघणार आहे. साई नाट्य मंदिरात उद्घाटन, परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन, कै. कमलबाई बाहेती सभागृह, नूतन कन्या प्रशालेत बालकट्टा, नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब.गिल्डा सभागृहात परभणीचे अंतरंग – निमंत्रित कवींची दोन कवी संमेलन व गझल मुशायरा, नूतन विद्यालय कर्मचारी पत संस्था सभागृहात कवी कट्टा होणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. अक्षर साहित्य संमेलनास पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोरे, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजी शनगरचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी ( किनवट ), प्रकाश होळकर ( नाशिक ), डॉ. राजेश गायकवाड ( परभणी ), बालरंगभूमी, मुंबई च्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के, कथाकार विलास सिंदगिकर, प्रा. यादवराव गायकवाड, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ.कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, एकनाथ आव्हाड,डॉ.मारोती कसाब, केशव बा. वसेकर, प्रा. रवीशंकर झिंगरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. अक्षर साहित्य संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सर्जेराव लहाने, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ.सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर आणि संयोजकांनी केले आहे.





