अतिवृष्टी व पीक नुकसानीची मदत न मिळाल्याने संताप; पालम तालुक्यातील शेतकरी ताब्यात
परभणी : अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याने महायुती सरकारने शेतकरी विरोधी धोरण अंगिकारल्याच्या निषेधार्थ, संतप्त झालेल्या एका शेतकर्याने मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हाधिकार्यांची गाडी फोडल्याची घटना घडली संतोष रावण पैके (रा. चाटोरी, ता. पालम) असे संतप्त शेतकर्याचे नाव आहे. परभणी जिल्ह्यात सर्वदूर अनेक वेळा अतिवृष्टी झाल्याने आणि पुराचे पाणी शेतात शिरल्याने लाखो हेक्टर जमिनीवरील पिके वाहून गेली होती. शासनाने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याने शेतकर्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती. या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारने शेतकरी विरोधी धोरण अंगिकारल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. याच संतापाचा उद्रेक झाल्याने शेतकरी संतोष पैके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला केला. घटनास्थळावरून पोलिसांनी शेतकरी संतोष पैके यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.





