देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 3, 2026
in परभणी
0
सर्वसमावेशक विकास व दूरदृष्टीचा अर्थसंकल्प
Please Share

महिला व आरोग्याला नवी दिशाशी-मार्ट्सद्वारे महिला उद्योजकतेला बळ; राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून यामुळे राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार आहे. महिला सक्षमीकरण, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात यातून मोठे बदल घडतील, असे प्रतिपादन राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.

या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कर वाटपापोटी ८९,८५५.८० कोटी रुपये तर केंद्रीय सहाय्य अनुदानापोटी ५०,५११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे राज्यातील विकासकामांना मोठा वेग मिळणार आहे.

‘शी-मार्ट्स’द्वारे ग्रामीण महिलांना बळ

अर्थसंकल्पातील ‘शी-मार्ट्स’ (Self Help Entrepreneur Marts) ही संकल्पना ग्रामीण महिलांसाठी क्रांतिकारी ठरेल, असे बोर्डीकर यांनी नमूद केले. या माध्यमातून महिला बचत गट आणि लघुउद्योगांना त्यांच्या उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. यामुळे ग्रामीण महिला केवळ कर्ज घेणाऱ्या न राहता स्वतःच्या उद्योगाच्या मालक बनतील आणि नोकरी देणाऱ्या उद्योजिका म्हणून समोर येतील.

कर्करोग उपचार आता स्वस्त

आरोग्य क्षेत्रासाठीही हा अर्थसंकल्प दिलासादायक आहे. कर्करोगाच्या उपचारातील १७ अत्यावश्यक औषधांवरील सीमाशुल्क पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उपचार खर्च कमी होऊन गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल, असे बोर्डीकर यांनी सांगितले.

रेल्वे आणि पायाभूत सुविधांचा विकास

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी १५,९४० कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत १२८ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच मुंबई, पुणे, नागपूर व ठाणे येथील मेट्रो प्रकल्प आणि १८,४६२ किलोमीटरपेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्यामुळे उद्योग व व्यापाराला गती मिळणार आहे. आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना आणि जल जीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी कुटुंबांना थेट लाभ मिळत असून हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post Views: 1,606
Please Share
Previous Post

नूतन कन्या शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप

Next Post

चिमुकल्यांची बँकिंग दुनियेत पहिली पायरी !

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चिमुकल्यांची बँकिंग दुनियेत पहिली पायरी !

चिमुकल्यांची बँकिंग दुनियेत पहिली पायरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ