शिष्यवृत्ती परीक्षेत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे यश
सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता ४ थी मध्ये नंदिका नरेश पाटील (२१८ गुण) व गौरी ताठे (२०० गुण) यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली. तर चैतन्य लाटे (१७० गुण), प्रणिता बनसोडे (१५२ गुण) आणि धनराज धापसे (१४४ गुण) हे विद्यार्थी पात्र ठरले.इयत्ता ७ वी मध्ये सय्यद अरमान सय्यद अली (२३० गुण) याने शिष्यवृत्ती प्राप्त केली. तर पवार वीरेन (१७८ गुण), टेकाळे श्रद्धा (१५४ गुण), अनुष्का कांबळे (१४८ गुण), चव्हाण श्रावणी (१३८ गुण) व घुले रुद्र (१२४ गुण) हे विद्यार्थी पात्र ठरले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध जोशी, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुलकर्णी, सचिव महेशराव खारकर, सहसचिव अभय सुभेदार, कोषाध्यक्ष ललित बिनायके, सदस्य जयंत दिग्रसकर, प्रवीण माणकेश्वर, डॉ. प्रवीण जोग, रामेश्वर राठी, ॲड. किशोर जवळेकर, विष्णूपंत शेरे, प्राथमिक मुख्याध्यापक संजय धारसुरकर व माध्यमिक मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





