देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 17, 2026
in परभणी
0
रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
Please Share

परभणी–परळी रेल्वेमार्ग दुहेरीकरण

परभणी : परभणी–परळी रेल्वेमार्ग दुहेरीकरण प्रकल्पाअंतर्गत भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात शेतकऱ्यांच्या हरकती, जमिनीचे मूल्यनिर्धारण, जनसुनावणी तसेच इतर प्रलंबित बाबींचा संवेदनशीलतेने विचार करून रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी–परळी रेल्वेमार्ग दुहेरीकरण प्रकल्पासंदर्भात शुक्रवारी, १७ जुलै रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, उपमुख्य अभियंता (निर्माण) छत्रपती संभाजीनगर-२ सुजीतकुमार, सीनिअर सेक्शन इंजिनिअर जे.पी मीना, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, संगीता चव्हाण, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अनिता भालेराव, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.बैठकीत शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेसंदर्भातील विविध आक्षेप, जमिनीच्या मूल्यनिर्धारणाबाबतच्या अपेक्षा, जनसुनावणीतील मुद्दे तसेच इतर अडचणी मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी या मुद्द्यांची नोंद घेऊन त्यावर सविस्तर चर्चा केली.जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असून, शेतकऱ्यांच्या भावना व अडचणी समजून घेऊन रेल्वे प्रशासनाने त्यांच्याशी सातत्याने संवाद साधावा. भूसंपादनाबाबत असलेल्या शंका, गैरसमज व आक्षेप दूर करून आवश्यक माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होऊन भूसंपादन प्रक्रियेस सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होईल.तसेच, जनसुनावणीत मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर नियमानुसार कार्यवाही करून प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, जेणेकरून दुहेरीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी विनाविलंब आणि सुरळीतपणे होईल, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

Post Views: 1,526
Please Share
Previous Post

कालिदास महाराज यांचे अपघाती निधन

Next Post

दीपस्तंभ प्रतिष्ठान प्रत्येक गरजूंमागे सक्षमपणे उभे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दीपस्तंभ प्रतिष्ठान प्रत्येक गरजूंमागे सक्षमपणे उभे

दीपस्तंभ प्रतिष्ठान प्रत्येक गरजूंमागे सक्षमपणे उभे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ