परभणी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा
परभणी : परभणी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, २९ जुलै २०२६ रोजी पार पडली. बैठकीस उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर आणि नगरसचिव विकास रत्नपारखी उपस्थित होते. सभेत ‘विशेष तरतूद २०२६-२७’ योजनेअंतर्गत २० कोटी रुपयांच्या २८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
सभेची सुरुवात जंतर-मंतरवरील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. नगरसेविका गिरीजा आजेगावकर यांनी विहिरींच्या स्वच्छतेबाबत महापौर, उपमहापौर, आयुक्त, उपायुक्त तुकाराम कदम, श्रीकांत कुर्रा व प्रल्हाद देशमाने यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. शहरात नऊ दिवस विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यावर तिरुमला खिल्लारे, गिरीजा आजेगावकर, सपना जुकटे, रितेश जैन यांनी जाब विचारला, तर पाणीपुरवठा प्रमुख तन्वीर बेग यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले. जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी प्रभाग समिती अंतर्गत स्वतंत्र कार्यालये आणि सीटीटीव्ही बसवण्याची घोषणा करण्यात आली.कार्डियाक ॲम्बुलन्सबाबत अश्विनी अमोल जाधव व अक्षय देशमुख यांनी मागणी मांडली. स्टेडियम परिसरातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी दिलीप ठाकूर यांनी केली. याशिवाय घरकुल व कबाला धारकांच्या प्रश्नांवर नदीम इनामदार, राजेश रणखांबे, मिलिंद बामणीकर, आकाश लहाने, बबलू घागरमाळे व श्याम खोबे यांनी मते मांडली. विकासकामांच्या मागणीसाठी अर्जुन सामाले आणि भगवान वाघमारे यांनी विविध विषय मांडले.सभेत लोककल्याण अभियानाचा ठराव प्रतिभाताई अतुल सरोदे यांनी मांडला. चर्चेत सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, गटनेते विजय जामकर, डॉ. केदार खटींग, शरफोद्दीन सिद्दिकी, शेख रईस शेख हबीब, तब्बसुम वसीम शेख, गणेश टाक, व्यंकट डहाळे, सुशीला थोरात, अद्वैत सांगळे आणि सुलोचना भालेराव यांनी भाग घेतला.




