देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
in परभणी
0
भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते
Please Share

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद

सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येकात भगवंताचे अस्तित्व आहे, त्यामुळे कुणाचाच द्वेष करू नये. भारतीय संस्कृती जिवमात्रासह वृक्षवल्ली, पशूपक्षी, पर्यावरण, सर्वांचा सन्मान करायला शिकविते, असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प. पद्मनाभ व्यास महाराज (धाराशिव) यांनी केले आहे. ते शहरातील साई मंदिर, ‘भक्तितीर्थ’ परीसरात, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भागवत कथेत भाविकांना आशीर्वचनपर सोमवार (दि. १५) रोजी तीसरे पुष्प गुंफताना बोलत होते.

तीर्थयात्रेचे पावित्र्य आणि सात्विक जीवन : ज्ञानमार्गने परमशक्तीला जाणणे यातच जीवनाची कृतार्थता आहे. तीर्थयात्रेला जाताना साधेपणा असावा. शृंगार, पोषाख सात्विक, विनयशील असावा. तीर्थ यात्रा आणि तीर्थ स्थानाचे पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे. आपण शुद्ध मन, वृत्तीने जीवन जगले पाहिजे. सद्विचाराने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हेच श्रीमद् भागवत कथा सांगते. कथा श्रवणाने जिवनाचे सार्थक होते, असेही पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले. यावेळी कथेचे विस्तृत विवेचन करताना ते म्हणाले की, आपले विचार लोकहीत करणारे असावेत. श्रवण, किर्तन, स्मरण, चिंतन, वर्तन, अध्ययन चांगले असावे. आपला वेळ सार्थकी लावावा.

पतीपत्नी संसार रथाची दोन चाके :

पतीपत्नी हे संसार रथाचे दोन चाके आहेत. पतीपत्नीने संतुलित रित्या व्यवहार करावा. एकमेकांना समजून घ्यावे. स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणे ही आपली संस्कृती आहे. घरात राहून परमार्थ साधावा. आपले कर्म, संसार निष्ठेने करत भावी संस्कारित पिढी घडवावी. सासू, सासरे, पतीची सेवा करणे हाच खरा धर्म आहे. माणसाने न्याय मार्गाने धन कमवावे, असे आवाहनही पद्मनाभ महाराज व्यास यांनी केले आहे.

भजनाने कथेचा प्रारंभ, मान्यवरांच्या हस्ते आरती

कथेच्या प्रारंभी सच्चिदानंद डाखोरे यांनी भजन गायले. सुत्रसंचलन प्रकाश कुरूंदकर, अनिल रत्नपारखी यांनी केले. श्रीमद् भागवत कथेत मिना शशिकांत कुलकर्णी, सुनंदा शरद कुलकर्णी, रवी मुळावेकर, रवी कुलकर्णी, नारायण इक्कर, गौतम सूर्यवंशी, सर्जेराव लहाने, रामराव गायकवाड, मंगल शरद ठाकर, कांचन सुरेश हिवाळे, भाग्यश्री पांडुरंग पाटणकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या कथेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,360
Please Share
Previous Post

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

Next Post

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ