नूतन विद्यालय सेलूचा निकाल ८०.४३ टक्के; आरिजखाँ पठाण जिल्ह्यात प्रथम
सेलू : महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये सेलू येथील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील एकूण ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून शाळेचा एकूण निकाल ८०.४३ टक्के लागला आहे.
या परीक्षेत इयत्ता ८ वीच्या एकूण २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यापैकी ०१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरला आहे. इयत्ता ९ वीच्या ३३ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून त्यातील ०३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. तसेच इयत्ता १० वीचे ०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ०२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत.शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ९ वीतील आरिजखाँ आजिम खाँ पठाण याने १५४ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच इयत्ता ८ वीचा वैद्य आर्यन वैजनाथ (१५७ गुण, तालुका स्तर), इयत्ता ९ वीचे क्षीरसागर अर्णव विशाल (१४८ गुण, विशेष पारितोषिक) व टिपणे व्यंकटेश दत्ता (१४१ गुण, तालुका स्तर), तसेच इयत्ता १० वीचे आर्दड सक्षम सुरेश (१३६ गुण, तालुका स्तर) व आर्दड सोहम सुरेश (१२९ गुण, उत्तेजनार्थ) यांनी यश मिळवले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सुधीर जोशी आणि सुशील कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, एस.जी.बोधनापोड, गणेश माळवे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून अभिनंदन केले आहे तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





